केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा : माजी आमदार अरुण पाटील :रावेरला राष्ट्रीय केळी दिन साजरा
जैन इरिगेशनतर्फे कार्यक्रमात केळीच्या ज्युसचे वितरण

प्रतिनिधी / रावेर
दरवर्षी एप्रिल महिन्याचा तिसरा बुधवार राष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा जैन इरीगेशनतर्फे गेल्या चार वर्षापासून राबवली जात आहे. येथील पिपल्स बँकेजवळ राष्ट्रीय केळी दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार अरुण पाटील, केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी यांच्या हस्ते केळीच्या खोडाचे व घडाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ केळी तज्ञ डॉ के बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
एप्रिल महिन्याचा तिसरा बुधवार हा राष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा केला जातो. उपस्थित मान्यवरांचे जैन इरिगेशन तर्फे रुपाल, टोपी देवून स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केळीचे तसेच केळीपासून बनविलेल्या ज्युसचे नागरिकांना वाटप करण्यात आले. येथील पिपल्स बँकेजवळ आयोजित कार्यक्रमात शेतकरी, नागरिकांनी उत्स्फुतपणे सहभाग घेतला. यावेळी रावेर केला युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील, माऊली हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ संदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, तापी इरिगेशनचे संचालक सोपान पाटील, गायत्री अग्रोटेकचे संचालक गुलाब पाटील, हरिओम अग्रोचे संचालक आर जी पाटील, तांदलवाडीचे प्रगतीशील शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, अटवाड्याचे प्रगतीशील शेतकरी विशाल अग्रवाल, केऱ्हाळा येथील अतुल पाटील, दिलीप पाटील, प्रणव पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे राहुल भारंबे, चेतन गुळवे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सेल्फी पॉइंट ठरला आकर्षण
या ठिकाणी राष्ट्रीय केळी दिनानिमित्त जैन इरिगेशने उभारलेला सेल्फी पॉइंट नागरिकासाठी विशेष आकर्षण ठरला. केळीची फणी हातात घेवून अनेकांनी येथे सेल्फी काढली. तर केळीपासून बनवलेल्या ज्युसचा महिला, शालेय विद्यार्थिनी, नागरिकांनी आस्वाद घेतला. या ज्युसची परिसरात नागरिकांमध्ये चर्चा होती. यावेळी केळीचे वितरण नागरिकांना करण्यात आले.
“राष्ट्रीय केळी दिनानिमित्त जैन इरिगेशनचे आयोजित केलेला उपक्रम केळी उत्पादk शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आहे. तसेच नागरीकांमध्ये केळीबाबत जागृती करणारा आहे. शेतकऱ्यांनी लागवडीचे क्षेत्र वाढविण्यापेक्षा निर्यातक्षम व उच्च गुणवत्तेचे उत्पादन घ्यावे.”
----- अरुण पाटील, माजी आमदार रावेर