BREKING NEWS : आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार : भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूकीच्या नागरिकांच्या तक्रारी : कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची आमदार पाटील यांची मागणी
बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची सूचना

प्रतिनिधी / रावेर
मुक्ताईनगर मतदार संघात समाविष्ट असलेल्या रावेर तालुक्यातील ४२ गावातील समस्या व प्रलंबित प्रश्न जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर तहसील कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेतली. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे भूमापक शेख व कुलकर्णी हे नागरिकांची आर्थिक पिळवणूक करूनही कामे करत नसल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. याची तात्काळ आमदार पाटील यांनी दखल घेवून अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीतूनच संपर्क साधला. व नागरिकांकडून पैसे घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सूचना देवूनही बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची सूचना तहसीलदार बी ए कापसे यांना दिल्या आहेत.
जनतेशी संवाद साधत मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, प्रलंबित असलेले प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच विकास कामे करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, गट विकास अधिकारी के [पी वानखेडे , नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख, एपीआय हरिदास बोचरे, एपीआय विशाल पाटील उपस्थित होते.
प्रत्येक गावातील शेत शिवारातील पाणंद रस्त्यांचे उद्या होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करून ते प्रस्ताव तहसील कार्यालयात तात्काळ जमा करावेत अशी सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे भूमापक शेख व कुलकर्णी हे नागरिकांकडून पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत अशा तक्रारी यावेळी चार ते पाच नागरिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. याची तात्काळ दखल घेत बैठकीतूनच या कर्मचाऱ्यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करीत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यावर अशा दुकानदारांवर पुरवठा विभागाने लक्ष ठेवून कारवाई करावी व त्यांची मोनोपोली तोडून टाका अशा सूचना तहसीलदार व पुरवठा विभागला दिल्या आहेत. 42 गावातील रस्त्यांचे प्रश्न नागरिकांनी यावेळी मांडले. त्यावर सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दखल घेवून या रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी यावेळी केल्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे तोडून रस्ता मोकळा करावा असे सांगितले. यावेळी सर्व विभागांचा आढावा संबधित विभाग प्रमुखांनी दिला. ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी अनुदान अडीच लाख रुपये करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, रावेर बांधकाम विभागाचे उप अभियंता एम बी चौधरी, सावदा बांधकाम विभागाचे उप अभियंता व्ही एस तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, रावेर आगार प्रमुख श्री पठाण, जिल्हा परिषद बांधकाम विभागचे अभियंता श्री इंगळे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष छोटू पाटील, लाडकी बहिण योजनेचे तालुका समन्वयक राहुल पाटील, भाजपचे हरलाल कोळी, डॉ दीपक साळुंखे, राहुल पाटील, संजय माळी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व नागरिक उपस्थित होते.