आमदार अमोल जावळे आक्रमक : शेतकऱ्यांना नुकसानीची मदत त्वरित देण्याची मागणी
900 हेक्टरवरील शेतकरी नुकसानीच्या प्रतिक्षेत

प्रतिनिधी/ रावेर
रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला.
शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी, कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या पत्रव्यवहारात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होते. यामुळे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो," असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले.जून- जुलै २०२३ मध्ये झालेल्या वादळात अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, संबंधितांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तसेच, नुकतेच २९ जून २०२५ रोजी झालेल्या वादळात सुमारे ९०० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे मागणी केली की, या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.