रावेर / प्रतिनिधी
कार्यकर्त्यांचा उत्साह, एकजूट आणि आत्मविश्वास पाहून पक्षात नवचैतन्य संचारले आहे.मतदार आजही काँग्रेसच्या विचारधारेसोबत असल्याचे दिसून येते असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रावेर तालुका काँग्रेस समितीतर्फे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. रावेर तालुक्यात काँग्रेस पुन्हा एकदा रणांगणात ताकदीने उतरायला सिद्ध असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रावेर तालुका व रावेर शहर काँग्रेस समितींची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला निरीक्षक डॉ. अरविंद कोलते (महासचिव, प्रदेश काँग्रेस कमिटी ) यांनी मार्गदर्शन केले. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका मतदारसंघांतील स्थिती, संभाव्य उमेदवार व विजयाच्या शक्यता यावर सविस्तर चर्चा केली. काही स्थानिक नेते काँग्रेसपासून दूर गेले असले तरी मतदार आजही काँग्रेसच्या विचारधारेवर आणि वारशावर ठाम श्रद्धा ठेवून आहेत. कार्यकर्त्यांनी याला पक्षासाठी एक मोठं बलस्थान आणि आगामी निवडणुकांतील प्रभावी अस्त्र म्हणून पाहिलं पाहिजे असे मत आहे असे मत प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. कोलते यांनी मतदारांचा विश्वास हेच काँग्रेसचे खरं सामर्थ्य आहे. आता हा विश्वास विजयात बदलण्याची वेळ आली आहे. मतदारांचे प्रेम आणि निष्ठा हेच आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान असले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, संजय जमादार(जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल), धुमा तायडे(शहराध्यक्ष रावेर), देविदास हडपे, हमीद शेठ, हरिष गनवाणी, विनायक महाजन, रामदास लहासे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.