शेतकरी म्हणतात... कृषि क्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा : जैन हिल्सला फालीचे अधिवेशन सुरु
शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव/प्रतिनिधी
शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व योग्य नियोजन करून दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतून मिळते. शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. मजूरांच्या टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात. त्यावर शाश्वत सोल्यूशन काढण्यासाठी जैन इरिगेशनचा सातत्याने प्रयत्न आहे असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यानी व्यक्त केले.
सकारात्मकतेतून शेतीकडे पहा
भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनची जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीविषयी समाजात उदासिनेतवर जास्त चर्चा केली जाते, परंतु सकारात्मक बाबींवर चर्चा केली पाहीजे फाली उपक्रमात ते दिसते. प्रत्येकाला रोज अन्न लागतेय त्यामूळे शेतीला भविष्य आहे. फक्त त्याकडे व्यावसायिक दृष्टीने बघीतले पाहिजे. बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. हमी भावाची शेती परवडत आहे. यासाठी करार शेती महत्त्वपूर्ण आहे. कृषिक्षेत्राला नकारात्मकतेतुन सकारात्मक दिशा देण्याचे काम जैन हिल्सवरून होत आहे. प्रत्येक पावलावर समस्या आहे. मात्र त्यासोबत त्याचे उत्तर ही मिळत असते. शेतीविषयी सर्वतोपरी तंत्रज्ञानाची माहिती ठेवली पाहिजे या भावना केळी, पपई, कांदा, हळद, कापूस, टोमॅटो, टरबूज, मका, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी सुसंवाद साधताना व्यक्त केल्या. बाजारपेठ, मार्केंटिग, फ्रुटकेअर व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादनासाठी घ्यायची काळजी, हवामानातील बदल, केळी उत्पादनाचे नफ्याचे गणिते, शेती आणि शिक्षणासह जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. निलेश पाटील (जामनेर), चंद्रकांत रामदास सोनाळकर (पहुर), छोटुराम तुकाराम पाटील (वाकी ता. जामनेर), पद्माकर जगन्नाथ पाटील (तराळी ता. चोपडा), गोविंदा गोळे बोदवड या शेतकऱ्यांनी भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले. जान्हवी नंगेश्वर, लक्ष्मी पाटील, प्रणव शिंदे, प्रगति सांगोळे, नंदिनी दहिकर, राशि मराठे, संतोष सावंत, आरव बंडी, लावण्या पाटील, श्रेया बरकले, मंदिरा शिंदे या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील 500 विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. जैन हिल्स येथील परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यू कल्चर येथे सहभागी विद्यार्थ्यांनी भेट दिली. जगप्रसिद्ध गांधी तीर्थच्या म्युझियमला भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांची गटचर्चा
या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे गट चर्चा झाली. यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील, डॉ. बिभूति पटनाईक (स्ट्रार ॲग्री), सुरज पानपट्टे (ॲग्री वेश), अरूण श्रीमाली(प्रोमेप्ट), शैलेंद्र जाधव, अंकिता (आयटी सि), वैभव भगत (उज्जवन), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज फूड), त्याच प्रमाणे यावल तालुक्यातील राजोरा येथील प्रगतशील शेतकरी दिपक सतिश पाटील, राहुल अरूण पाटील (दापोरा- बु-हाणपूर) सहभागी झाले होते.